मांत्रिकांनीच घडऊन आणला नऊ जणांचा हत्याकांड !
सांगली : महाराष्ट्रातील चित्तथरारक घटना म्हैसाळ, तालूका मिरज येथील एकाच कुटुंबातील नऊजणांच्या सामूहिक आत्महत्या प्रकरणाला सोमवारी नवे वळण आले आहे. वनमोरे कुटुंबीयांनी आत्महत्या केली नसून , विष देऊन त्यांचा खून करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
या प्रकरणी सोलापूरच्या दोघांना अटक करण्यात आली. गुप्तधनाच्या प्रकरणातून हे हत्याकांड घडल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे . आब्बास महंमदअली बागवान वय ४८ वर्ष राहणार मुस्लिम पाच्छा पेठ , सोलापूर व धीरज चंद्रकांत सुरवसे वय ३० वर्ष राहणार वसंतविहार ध्यानेश्वरीनगर , सोलापूर अशी अटक करण्यात आलेल्या व्यक्तींचे नावे आहेत. हे दोघेही मांत्रिकच आहेत. त्यांनीच गुप्तधनाचे आमिष दाखवून वनमोरे कुटुंबाकडून वारंवार पैसे घेतले होते . घटनेच्या आदल्या रात्रीही संशयित म्हैसाळ येथे येऊन गेले होते . मृत वनमोरे बंधूंसोबत त्यांच्या गुप्तधनाबाबत भेटी होत होत्या . यासाठी त्यांनी दोघांना पैसेही दिले होते , असे तपासात स्पष्ट झाले आहे .