नागपूर : आरक्षण हक्क कृती समिती आणि विविध ओबीसी , एससी , एसटी , भटके विमुक्त आणि आंबेडकराईट संघटनांच्या वतीने केंद्र व राज्य सरकारचे हुकुमशाही व मागासवर्गीय धोरणाच्या विरोधात ३ ऑक्टोबर रोजी सकाळी 11.30 वाजता यशवंत स्टेडियम नागपूर ते विभागीय आयुक्त कार्यालयावर विराट ‘जनआक्रोश मोर्चा’काढण्यात येणार आहे.
देशात वाढलेली बेरोजगारी व महागाईने जनता त्रस्त आहे . संविधानिक अधिकाराचे हनन केले आहे . धर्मांधता वाढली असून जातीयवाद फोफावला आहे , महिलावर बलात्कार करणाऱ्याचे धर्मांध संघटना सत्कार करीत आहे , संविधान जाळणारे देशद्रोही मोकाट फिरत आहे.
ओबीसी , एससी , एसटी , अल्पसंख्याकांचे नागरी हक्क धोक्यात आले आहे, विरोध करणाऱ्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल केल्या जता आहे , न्यायालये सुद्धा संविधानिक न्याय देत नाही व गुन्हेगारांसाठी रात्रीचे निर्णय घेत असल्याचे दिसुन येत आहे . त्यामुळे वंचित व अल्पसंख्याक समुह भयभीत झाला आहे.
संविधानाची योग्य अंमलबजावणी करण्यास केंद्र व राज्य सरकार कुचराई करीत आहे , त्यामुळे जनतेमध्ये सरकारविषयी आक्रोश आहे . अनेक वर्षापासून नोकरभरती बंद आहे . 2 कोटी दरवर्षी रोजगार देण्याची घोषणा हवेतच आहे . लाखो तरुण बेरोजगार आहेत.
शिक्षण फक्त श्रीमंता साठीच आहे. सरकारी रुग्ण सेवा मोडकळीस आली आहे . सामान्य नागरिकांना आरोग्य सुविधा दुरापास्त झाली आहे . ओबीसीच्या आरक्षणाला क्रिमीलेअर लावले व इ.डब्ल्यू.एस . आरक्षण विना चर्चेविना मंजुर केले . परंतु मागासवर्गीयांचे पदोन्नतीतील आरक्षण हुकुमशाही पद्धतीने व बेकायदेशीरपणे सरकारने रद्द केले . शिष्यवृत्ती वेळेवर व पुरेशी मिळत नाही.
लॅटरल एन्ट्री द्वारे महत्त्वाचे पदावर नियुक्ती दिल्याने गुणवत्ता धारकावर अन्याय केला आहे . वही पेन्सील व अन्नधान्यावर जीएसटी लावून सरकारने गरीबांचे जगणे मुश्कील केले आहे . विशिष्ट वर्गाच्या हातात कायम सत्ता असावी यासाठी ओबीसीची जातीय जनगणना केली जात आहे . अग्नीपथ सारखी योजना आणून देशातला तरुण चार वर्षात रिटायर झाल्यावर हा तरुण वाममार्गाला लागणार , असे धोरण देशाला हानिकारक आहे.
भांडवली व्यवस्थेला पूरक कृषि धोरण असल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहे . नविन शैक्षणिक धोरण मागासवर्गीय विरोध आहे . सनातन धर्माचे बाळकडू शिक्षणातून दिले जाणार आहे . देशावर धार्मिक गुलामी लादणारे नविन शिक्षण धोरण आहे . खाजगीकरण करून देशाची संपत्ती काही मोजक्या भांडवलदाराच्या हातात देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे . राफेल सारखे प्रकल्प खाजगी कंपनीकडे देणारे निर्णय देशाच्या सुरक्षा धोक्यात आणणारा आहे . भांडवलदारांचे सात वर्षात दहा लाख कोटीचे कर्ज माफ करणारे निर्णय देशाला अधोगतिला नेणारा आहे.
आज देशात महिलावर दिवसेंदिवस अत्याचाराच्या घटना घडत आहे , दलितावरील वाढते अत्याचार वाढले आहे देशात अराजक परिस्थिती निर्माण झाली आहे , धर्मांधता पराकोटीचे वाढली असून जातीयवाद उग्र रूप घेत आहे , सनातन धर्माचा प्रभाव वाढला आहे . धर्मनिरपेक्ष संकल्पना मोडून काढली जात आहे . धर्माचस्या नावावर एका वर्गाचे प्राबल्य निर्माण केले जात आहे . अशीच परिस्थिती कायम राहली तर या देशात पुन्हा वर्णव्यवस्था निर्माण होईल व येथील सर्वसाधारण नागरिक या ब्राह्मणी व्यवस्थेचाच गुलाम होणार आहे.
देशात पुन्हा मनुस्मृती येऊ द्यायची नाही व संविधानाचे एकजुटीने रक्षण करणे काळाची गरज आहे या निर्धाराने सर्व ओबीसी एसएसटी भटक्या विमुक्त , मायनारिटीज व आंबेडकराईट संघटना एकत्र आल्या असून सरकारच्या विरोधात एकजुटीने लढा देण्यासाठी सर्वांनी 3 ऑक्टोबरच्या विराट जन आक्रोश मोर्चात सामील व्हावे असे आवाहन आयोजकांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली आहे.